गोल पोस्ट इतर राजकारण निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करा, पक्षाचे नवे चिन्ह घ्या : शरद पवारांचा...

निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करा, पक्षाचे नवे चिन्ह घ्या : शरद पवारांचा उद्धव यांना सल्ला

मुंबई, १८ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ आणि निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ असे नाव दिले आहे. याबाबत उद्धव ठाकरे गट आक्रमक असून, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची चर्चा आहे; मात्र ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करून नवीन निवडणूक चिन्ह घेण्यास सांगितले आहे.

शदर पवार म्हणाले, ”हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. एकदा निर्णय घेतला की चर्चा होऊ शकत नाही. ते स्वीकारा आणि नवीन निवडणूक चिन्ह मिळवा. त्याचा (जुन्या चिन्हापासून दूर जाणे) फार मोठा परिणाम होणार नाही. कारण लोक ते स्वीकारतील.” (नवीन चिन्ह) पुढील १५-३० दिवस चर्चेत असेल, एवढेच. हातात जोखड घेऊन काँग्रेसला दोन बैलांचे चिन्ह बदलण्याची आठवण शदर पवार यांनी करून दिली आणि त्यांनी काँग्रेसचे नवे चिन्ह जसे स्वीकारले, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाचे नवे चिन्ह जनता स्वीकारतील, असे सांगितले.

शरद पवार म्हणाले, ”मला आठवते, की इंदिरा गांधींनाही या परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसचे ‘जोखड असलेले दोन बैल’ हे चिन्ह होते. नंतर त्यांनी ते गमावले आणि ‘हात’ हे नवीन चिन्ह म्हणून स्वीकारले आणि लोकांनी ते स्वीकारले; तसेच उद्धव ठाकरे गटाचे नवे चिन्ह जनता स्वीकारणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाचा आपला गट खरी शिवसेना म्हणून ओळखण्याचा निर्णय म्हणजे सत्य आणि जनतेचा विजय असल्याचे म्हटले आहे. आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. हा सत्याचा आणि जनतेचा विजय आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचाही आशीर्वाद आहे. आमची शिवसेना खरी आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version