गोल पोस्ट इतर ‘आर्यन खानवर ड्रग्स सेवन केल्याचा आरोप, मात्र NCB ने वैद्यकीय चाचणी घेतलीच...

‘आर्यन खानवर ड्रग्स सेवन केल्याचा आरोप, मात्र NCB ने वैद्यकीय चाचणी घेतलीच नाही’

मुंबई, 10 ऑक्टोंबर 2021: सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे. आर्यनला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील सतीश मानशिंदे यांनी खूप प्रयत्न केले होते. पण एनसीबीने मांडलेले जोरदार युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आर्यन खानला दिलासा दिला नाही. या प्रकरणाचा एक नवा पैलू समोर आला आहे. सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले की एनसीबीने आर्यन खानचे रक्त आणि लघवीचे नमुने घेतले नाहीत. तर रेव्ह पार्ट्यांवर छापा टाकल्यानंतर आरोपीचे नमुने घेतले जातात.

एनसीबीने आर्यनची रक्त तपासणी केली नाही

वकील मनशिंदे यांनी न्यायालयात दंडाधिकाऱ्यांना सांगितले की, आर्यन खानने ड्रग्सबाबत आपली रक्त चाचणी देण्याची ऑफर दिली होती. पण एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी नमुना घेण्यास नकार दिला. आर्यन खानला त्याचा मित्र अरबाज मर्चंटसह एनबीसी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजावर पकडले. एनसीबीने आर्यनचे रक्ताचे नमुने का घेतले नाहीत, या गोष्टचे सर्व कायदेशीर तज्ञ आणि अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटेल, ज्यांनी अशा अनेक ड्रग पार्ट्यांचा भंडाफोड केला आहे.

रेव्ह पार्टीवर छापा घातल्यावर काय होते?

2012 च्या ड्रग रेव्ह पार्टीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. त्या पार्टीतील 90 टक्के लोकांनी ड्रग्ज घेतले होते. ज्याने ड्रग्स घेतली नव्हती त्याचा वैद्यकीय अहवाल स्वच्छ होता आणि त्याला सोडून देण्यात आले. या रेव्ह पार्टीमध्ये सेलेब्स आणि क्रिकेटर्ससह 100 लोक उपस्थित होते. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी ड्रग्स घेतली होती त्यांच्यावर ड्रग्सच्या प्रमाणाच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. जर एखाद्या व्यक्तीकडे मादक पदार्थांचे प्रमाण अधिक आढळले तर त्याच्यावर ड्रग्स विक्रेता म्हणून गुन्हा नोंदवला जातो. तर कमी प्रमाणात सापडलेल्यांवर ड्रग्सच्या वापरासाठी गुन्हा नोंदवला जातो.

एनसीबीने आर्यन खानची चाचणी का घेतली नाही?

कायदेतज्ज्ञांच्या मते, जर NCB ने आर्यनची चाचणी केली असती आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असता, तर त्यांना आर्यनला ताबडतोब खटल्यातून मुक्त करावे लागले असते. दुसरीकडे, एनसीबी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पार्टी होणे बाकी होते आणि ड्रग्जचे सेवन अद्याप झाले नव्हते, म्हणून त्यांना ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोपींची गरज नव्हती. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version