गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट टीम इंडियाने जिंकली सलग चौथी एकदिवसीय मालिका, दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा ५ विकेटने...

टीम इंडियाने जिंकली सलग चौथी एकदिवसीय मालिका, दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा ५ विकेटने पराभव

पुणे, २१ ऑगस्ट २०२२: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ५ विकेटने जिंकला. यासह भारतीय संघाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने झिम्बाब्वेला ३८.१ षटकांत अवघ्या १६१ धावांत गुंडाळले होते. शार्दुल ठाकूरने ३ बळी घेतले. यानंतर संजू सॅमसनच्या (४३) धावांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. त्याचवेळी धवन आणि शुभमन गिल या दोघांच्याही बॅटमधून ३३-३३ धावा झाल्या. झिम्बाब्वेकडून ल्यूक जोंगवेने सर्वाधिक २ बळी घेतले.

भारताने सलग चौथी वनडे मालिका केली आपल्या नावे

भारतीय संघाने वनडेत सलग चौथी मालिका जिंकली आहे. यापूर्वी त्याने या वर्षी दोनवेळा वेस्ट इंडिज आणि एकदा इंग्लंडचा पराभव केला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-

भारत: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, प्राणंदिक कृष्णा आणि मोहम्मद सिराज.

झिम्बाब्वे: तकुडवानाशे कैतानो, इनोसंट कैया, शॉन विल्यम्स, वेस्ली मधेवेरे, सिकंदर रझा, रेगिस चकाबवा (सी आणि wk), रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्युची, तनाका चिवांगा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version