गोल पोस्ट इतर राजकारण देशद्रोही ही फटाके फोडत आहेत’, उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल

देशद्रोही ही फटाके फोडत आहेत’, उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई, १२ मे २०२३: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी जसा राजीनामा दिला तसाच सध्याच्या असंवैधानिक पद्धतीने स्थापन झालेल्या सरकारनेही राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात देशद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, अशा परिस्थितीत भाजपवाल्यांनी फटाके फोडले असते तर समजले असते, पण गद्दारही फटाके फोडत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत होते. या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आज त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवता आले असते. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीवरून सध्याचे सरकार बेकायदेशीरपणे स्थापन झाल्याचे सिद्ध होते.

आता त्यांच्याप्रमाणेच आजच्या असंवैधानिक सरकारनेही स्वतःहून राजीनामा द्यावा. याच प्रमाने त्यांनी विधानसभा अध्यक्षांवरही भाष्य केले. सध्या लंडनच्या दौऱ्यावर असल्याचे सांगितले. परतल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील अशी आशा आहे. तसे न झाल्यास ते पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आहेत. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारला तातडीने दिलासा मिळाला आहे. मात्र सभापती लवकरात लवकर याबाबत ठोस निर्णय घेतील, अशी आशा आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version