लॉकडाऊनच्या काळात १ लाख १२ हजार गुन्ह्यांची नोंद

मुंबई, दि. २४ मे २०२०: राज्यात २४ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १२ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,१२,७२५ गुन्हे नोंद झाले असून २२,७५३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी २२ लाख ९८ हजार ४७७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४६ घटना घडल्या. या हल्ल्यातील संबंधित ८२७ व्यक्तींना ताब्यात घेतले गेले आहे.

२४ मार्च पासून सुरू झालेला लॉकडाऊन मध्ये १०० नंबर वर ९५,४६७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. क्वारंटाईनचा शिक्का असणाऱ्या ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. एकूण क्वारंटाईनचा आकडा पाहता राज्यात ४,९७,७०५ व्यक्ती क्वॉरंटाईन आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ४,१५,५९१ पास देण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील १० पोलीस व १ अधिकारी असे एकूण ११, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१ ठाणे शहर १ व  अशा १८ पोलीसवीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या १३२ पोलीस अधिकारी व ९९१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा