दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी बंधनकारक

पुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन ७५ टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे दिले जाणार असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्पष्ट केले आहे.

याबाबत सीबीएसईने विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के उपस्थिती असण्यासंदर्भातील सूचना देशभरातील शाळांना १८ जुलैला परिपत्रक पाठवून दिल्या होत्या. यावर दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने ७५ टक्के उपस्थिती संदर्भातील कार्यवाही करण्याची सूचना पुन्हा एकदा सीबीएसईकडून शाळांना देण्यात आली आहे. सीबीएसईकडून नुकतेच या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा १ जानेवारीपासून आढावा घेतला जाणार आहे. कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयांना पाठवली जाणार आहे. आजारपण, जवळच्या व्यक्तीचे निधन, स्पर्धेतील सहभाग असे कमी उपस्थितीचे कारण असल्यास ते सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या साठीचे पुरावे ७ जानेवारीपर्यंत विभागीय कार्यालयाकडे सादर करावे लागतील. ७ जानेवारीनंतर कोणाही विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही. असे सीबीएसई सांगितले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा