२८% कोविड – १९ प्रकरणात कोणतीही लक्षणे आढळली नाही: आयसीएमआर

नवी दिल्ली, दि. ३१ मे २०२०: इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) गेल्या दोन महिन्यांत कोरोनाव्हायरसवरील दोन अभ्यासाची माहिती उघड केली आहे. २२ जानेवारी ते ३० एप्रिल या काळात ज्यांना कोविड -१९ ची लागण झाली त्यापैकी २८% रुग्ण कोणतीही लक्षणे नसलेले (लक्षणांशिवाय) होते. या काळात एकूण ४०,१८४ रुग्ण सकारात्मक आढळून आले त्यापैकी २.८% आरोग्य कर्मचारी होते. तीन महिन्यांत १०.२१ लाख लोकांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी ३.९% कोविड -१९ सकारात्मक निघाले.

मागील अभ्यासामध्ये अनेक एसीम्प्टोमॅटिक प्रकरणे आढळली

२१ एप्रिल रोजी आयसीएमआरने नमूद केले आहे की त्यांच्या अभ्यासानुसार ६९% प्रकरणे एसीम्प्टोमॅटिक आहेत. जी सध्याच्या २८% पेक्षा जास्त आहे. तोपर्यंत सुमारे चार लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आणि १८,६०१ सकारात्मक आढळले. ताज्या अभ्यासानुसार गेल्या ८ आठवड्यात चाचणी अनेक पटींनी वाढली आहे. मार्चच्या सुरूवातीस, जेथे एका दिवसात २५० लोकांची चाचणी घेण्यात आली होती, एप्रिलच्या अखेरीस ही संख्या दररोज ५० हजार चाचणी गाठली होती.

किती खरा आहे हा आकडा?

कोविड -१९ विषयी सकारात्मक आलेल्या प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून न आख्यानक आयसीएमआरने असे सांगितले की, तपासणी दरम्यान लोकांना त्यांना काय त्रास होत आहे हे सांगता आले नाही त्यामुळे डॉक्टरांपर्यंत चुकीची माहिती गेली. लोकांमध्ये हा वायरस कोणत्या पातळी पर्यंत पोहोचला आहे याची माहिती सिरोलॉजिकनल सर्वे मधून मिळवली जात आहे. या सर्व्हेनुसार असे समोर आले आहे की कमी अंतरावर असलेल्या व्यक्तींमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे. तसेच पुरुष आणि वृद्ध लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

कोण कोरोनाचे लक्ष्य बनले

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासानुसार, २८.१ % एसिम्‍प्‍टोमेटिक प्रकरणांपैकी २५.३ % रुग्ण थेट आणि उच्च जोखमीच्या संपर्कात आहेत. जर आपण दर १० लोकसंख्येच्या संक्रमणाचे प्रमाण पाहिले तर ५०-६९ वर्षे वयोगटातील रुग्ण ६३.३% आहेत. १० वर्षांखालील मुलांसाठी कोरोनाचा आक्रमण दर ६.१% होता. कोविड -१९ पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आले आहे. अभ्यासानुसार ४१.६ टक्के पुरुष सकारात्मक होते तर २४.३ टक्के महिलांमध्ये संसर्ग होता.

रुग्णांनी अशी लक्षणे नोंदवली

१२,८१० अशी प्रकरणे आहेत ज्यात नमुने घेताना रुग्णांना लक्षणे आढळली. खोकला आणि ताप हे सर्वात सामान्य होते. जवळजवळ एक तृतीयांश लोक म्हणाले की त्यांच्या घशात खवखव आहे आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. ५ पेक्षा कमी प्रकरणांमध्ये पोटदुखी, उलट्या, चक्कर येणे, अतिसार सारखी लक्षणे दिसली. ३० एप्रिलपर्यंत कोरोना विषाणू देशातील जवळपास ७१% जिल्ह्यात पोहोचला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा