तिसरा टी-२० पावसामुळे रद्द, टीम इंडियाने मालिका २-० ने जिंकली

पुणे, २४ ऑगस्ट २०२३ : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना बुधवारी संततधार पावसामुळे रद्द करावा लागला. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. दुखापतीतून पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने, पावसाने प्रभावित झालेला पहिला सामना डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारे दोन धावांनी आणि दुसरा सामना ३३ धावांनी जिंकला. पावसामुळे शेवटच्या टी-२० मध्ये नाणेफेकही होऊ शकली नाही.

अनेक तपासण्यांनंतर पंचांनी नियोजित सुरुवातीच्या वेळेनंतर तीन तासांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुखापतीतून परतलेल्या बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन वेगवान गोलंदाजांसाठी ही मालिका चांगली होती. दोघांनी दोन सामन्यात चार विकेट घेतल्या. या दोघांची आता ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वनडे आशिया चषक स्पर्धेत कसोटी लागणार आहे.

भारतासाठी ५ ऑक्टोबरपासून घरच्या मैदानावर सुरू होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बुमराहचा फॉर्म आणि तंदुरुस्ती महत्त्वाची ठरेल. बुमराहच्या नेतृत्वाखालील या मालिकेने तरुणांना पुढील महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी तयारी करण्याची संधी दिली, जिथे वरिष्ठ खेळाडू विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असल्याने भारत दुसऱ्या क्रमांकाचा संघ पाठवेल.

चीनमध्ये संघाचे नेतृत्व करणाऱ्या रुतुराज गायकवाडला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात बहुतांश वेळा बाहेर बसल्यानंतर, दोन बॅक टू बॅक मॅचेस खेळण्याची संधी मिळाली. रविवारी भारताने ३३ धावांनी विजय मिळवताना त्याने अर्धशतक झळकावले. तथापि, ही मालिका आयपीएल सेन्सेशन रिंकू सिंगच्या पदार्पणासाठी देखील लक्षात ठेवली जाईल, ज्याने आपल्या एकमेव डावात प्रभाव पाडला.

एकदिवसीय फॉर्मेटमध्ये लोकेश राहुलचा बॅकअप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, संजू सॅमसनने दुसऱ्या टी-२० मध्ये ४० धावा केल्या परंतु विश्वचषक संघात स्थान मिळवण्याची त्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे शिवम दुबेने चेंडू आणि बॅटने योगदान दिल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा