देशात ४० हजार तर राज्यात २७ हजार नवीन कोरोना प्रकरणे

मुंबई, २१ मार्च २०२१: एकीकडे कोरोना विषाणू पुन्हा देशभर पसरत आहे, तर दुसरीकडे या साथीच्या रोगा विरुद्ध युद्ध सुरू आहे. या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठत शनिवारीपर्यंत भारतात ४.३६ कोटी लस देण्यात आल्या आहेत. शनिवारी लसीकरणाच्या ६४ व्या दिवशी रात्री ७ वाजेपर्यंत देशभरात १६.१२ लाख लसी देण्यात आल्या. वाढता संसर्ग लक्षात घेता मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या अनेक राज्यांत लसीकरणाला वेग देण्याची योजना आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात दररोज नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी, देशात २४ तासांत ४०,९५३ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि १८८ मृत्यू झाले. यावेळी २३,६५३ लोक बरे झाले. देशात आतापर्यंत कोरोनाची एकूण १,१५,५५,२८४ प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यापैकी १,११,०७,३३२ बरे झाले आहेत, एकूण सक्रिय प्रकरणे २,८८,३९४ आणि एकूण मृत्यू १,५९,५५८ आहेत.

महाराष्ट्रात २७ हजार नवीन प्रकरणे आणि १९ मृत्यू

शनिवारी राज्यात कोरोनाची २७,१२६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि १९ लोक मृत्युमुखी पडले. राज्यात मृत्यूचे प्रमाण २.१८% आहे. सध्या ९,१८,४०८ लोक होम क्वारंटाईन आणि ७,९५३ संस्थात्मक अलग ठेवण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण १,९१,००६ प्रकरणे ऍक्टिव्ह आहेत.

शनिवारी मुंबईमध्ये २०८२ नवीन प्रकरणे नोंदवली गेली असून ७ मृत्यू झाले आहेत. नागपुरातील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद आहेत. दुपारी ४ पर्यंत दुकाने उघडे राहतील. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच राहील, परंतु उर्वरित बाजारपेठा बंद राहतील. नागपुरात ३१ मार्चपर्यंत सर्व निर्बंध लागू होतील.

राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ११ मार्च ते ८ एप्रिल या काळात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दर शनिवारी आणि रविवारी १००% लॉकडाउन होईल. शनिवारी दुसऱ्या आठवड्यात शहरात पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आला. औरंगाबाद महानगरपालिकेकडून शहरात अधिकाधिक तपास सुरू आहे. पोलिस प्रत्येक लोकांची तपासणी करत असून नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाई देखील करत आहे.

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी, धारावी येथे फेब्रुवारीच्या तुलनेत या महिन्यात कोरोना प्रकरणात ६२% वाढ झाली आहे. मार्चमध्ये आतापर्यंत येथे २७२ प्रकरणे दाखल झाले आहेत. बीएमसीच्या मते, नोव्हेंबरमध्ये आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये धारावीतील केसेसमध्ये लक्षणीय घट झाली होती,

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा