पुणे पंढरपूर मार्गावर अपघातात मृत झालेल्याच्या कुटुंबियांना मदत मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा

फलटण, १९ मे २०२३ : फलटण येथील पुणे पंढरपूर मार्गावर अपघातात मृत झालेल्या गणेश लोंढे व अमीर शेख कुटुंबियांना प्रत्येकी ५०-५० लाख आर्थिक मदत मिळणेबाबत तसेच आर. के. सी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनी वर कारवाई करणेबाबत फलटण तालुक्यातील तरुणाईने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर प्रचंड गर्दीत मोर्चा काढला .


आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या आर. के. सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली; कंपनी च्या नियमबाह्य व धोकेदायक कामामुळे अमीर शेख व गणेश लोंढे या दोन व्यवसायिक तरुणांना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी आर. के. सी कंपनी यांच्या विरोधात गुरुवारी सकाळी १० वाजता फलटणकरांनी मोर्चा चे आयोजन केले होते.

१५ मे रोजी रात्री तांबमळा येथील गुरू हॉटेलचे पुढे आर. के.सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या सूर्यस्ता नंतरही मुरूम वाहतूक करणाऱ्या दहा चाकी टिपर ने फलटण येथील दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना दिलेल्या धडकेत फरपटत नेत अपघात केला यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.फलटण येथील दोन तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या आर. के.सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली कंपनी यांच्या विरोधात मृत कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी फलटणकरांनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन मंगळवार पेठ फलटण
येथून, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत कार्यालय) पर्यंत सदरचा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मोठया प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, आर. के. सी इन्फ्रास्टक्चर प्रा. लि कंपनीच्या मनमानी व बेकायदेशीर कामामुळे होतकरु निष्पाप तरुणांचा बळी घेतला आहे. ठेकेदाराने आपण या बळीला कारणीभूतच नाही असे भासवण्यासाठी घटनेच्या त्याच रात्री पहाटे ३ वाजता दुहेरी वाहतुक सुरळीत करण्यात आली अपघातास कारणीभूत अधिका-यावर तसेच कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. गेल्या १५ दिवसात अनेक अपघात याच रोडवर झालेले आहेत आणि लोक जिवानीशी गेले आहेत काहींना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेले आहे. परंतु लोकांच्या सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना प्रशासनाकडुन घेतली गेलेली नाही प्रांतअधिकारी व तहसिलदार अधिकारी यांनी जर ठेकेदारावर अंकुश ठेवला असता तर आज अमिर शेख व गणेश लोंढे यांचे प्राण वाचले असते. अमिर शेख व गणेश लोंढे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५०-५० लाखाचा निधी देण्यात यावा तसेच या दोघांचा बळी घेणा-या कंपनीवर गुन्हा दाखल करावा व काळया यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावा.

या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने फलटणकर जनता सहभागी झाली होती.अनेक तरुणांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर आपल्या भाषणातून रोष व्यक्त केला. अपघात त मृत्यू मुखी झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रशासनाने मदत करावी अशी मागणी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा