पुण्यात एक धक्कादायक घटना; गारवा बिर्यानी मॅनेजरवर तलवारीने वार करत केला खून

पुणे, ३० ऑक्टोबर २०२२: दुचाकीवर घरी जात असताना गारवा बिर्यानीच्या मॅनेजरवर अज्ञातांनी डोक्यात तलवारीने वार करुन त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे‌. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भरत भगवान कदम (वय २४ राहणार धायरेव्श्रर प्राईड मतेनगर धायरी पुणे) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी भरत यांचे भाऊ प्रकाश कदम यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री काम संपल्यानंतर भरत हे आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना धायरेश्र्वर मंदिर ते पारे कंपणी दरम्यान हल्लेकोरांनी त्यांना अडवून तलवारीने डोक्यात वार करुन त्यांचा खून करण्यात आला.

त्यांच्या जवळच्या वस्तुही चोरी गेलेल्या नाहीत.त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा अंदाज आहे. भरत कदम यांच्या खूनामागे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार आणि सिंहगड पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने हल्लेकोरांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा