आपला देश धर्मशाळा नाही: राज ठाकरे

पुणे: केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात देशभर हिंसक आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. सरकारने कायदा आणून मुद्दाम अस्थिरता निर्माण केली आहे, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचे शिबिर घेतल्यानंतर आज (शनिवार) राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर वक्तव्य केले. नागरिकत्व कायद्यावरून देशभर आगडोंब उसळला असून, हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने मुळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी असले कायदे आणले जात आहेत. आपला देश धर्मशाळा नाही, असे राज यांनी म्हटले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा