मास्क न वापरणाऱ्या २९ जणांवर कारवाई

सातारा ,२५ एप्रिल २०२० :लोणंद शहरात बुधवार दि.२३ व गुरुवार दि.२४ रोजी, भाजी विकताना मास्क न वापरणाऱ्या २९ भाजी विक्रेत्यांवर, नगरपंचायतच्या वसुली विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगरपंचायतीच्या दि.२४ च्या सुधारीत आदेशान्वये, मास्क न वापरल्यास, पहिल्या वेळी ५०० रु. दंड व दुसऱ्या वेळी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकल्यास, पहिल्या वेळी १००० रु. दंड व दुसऱ्या वेळी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचा भंग केल्यास नागरिकांना, पहिल्या वेळी ५०० रु. व दुकानदारांना १००० रू. दंड तर दुसऱ्या वेळी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंध केलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावर भाजीपाला व फळे विक्रेते यांनी व्यवसाय केल्यास पहिल्या वेळी ७००/- रु. दंड तर दुसऱ्या वेळी फौजदारी कारवाई करण्यात येईल असे लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी सांगितले आहे. तसेच सर्व नागरिकांनी या सुचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा