मुंबई, १९ नोव्हेंबर २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला असलेली पंढरपूरची कार्तिकी वारी, यशस्वी व्हावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत विधानभवनात वारीच्या नियोजनासंदर्भात वारकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते.
मर्यादित संख्येतल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी करायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव वारकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आला आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलबध व्हाव्यात, कायदा आणि सुरक्षा राखली जावी यासाठीही राज्य सरकार योग्य नियोजन करेल असा विश्वासही पटोले यांनी वारकऱ्यांना दिला.
या बैठकीला संबंधित अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि वारकरी परिषद संस्थानाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: