अमिताभ बच्चन आणि केबीसीचे निर्माते यांच्याविरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी एफआयआर दाखल

मुंबई, ४ नोव्हेंबर कौन बनेगा करोडपती होस्ट अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही शोच्या निर्मात्यांविरूद्ध शुक्रवारी करमवीर या विशेष एपिसोडवर विचारलेल्या प्रश्नासाठी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लखनौमध्ये ही एफआयआर नोंदविण्यात आल्याची नोंद आहे.अभिनेता अनुप सोनी आणि सामाजिक कार्यकर्ते बेजवाडा विल्सन हॉट सीटवर असताना बच्चन यांनी ६, ४०, ००० रुपयांच्या रोख पुरस्कारासाठी एक प्रश्न विचारला ज्याने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले.
प्रश्न असा होता की ,

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बी.आर. आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या?

पर्याय असे होते

(अ) विष्णू पुराण (बी) भगवद्गीता, (क) ऋग्वेद (डी) मनुस्मृती

उत्तर मनुस्मृती म्हणून घोषित करतांना बिग बी यांनी स्पष्ट केले की डॉ. आंबेडकर यांनी पुरातन हिंदू ग्रंथाच्या प्रतींची निंदा केली आणि त्या जाळल्या. या प्रश्नावर आपला संताप व्यक्त करण्यासाठी एकाधिक लोकांनी कार्यक्रमाचे होस्ट व निर्माते यांच्यावर एकापाठोपाठ एक असे ट्विट ट्विटरवर केले. असे चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर लिहिलेः

इतर अनेक वापरकर्त्यांनी शोवर “डाव्या विचारांचा” प्रपोगंडा चालविला असल्याचा आरोप केला, तर काहींनी या शोने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत असे ही म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा