रत्नागिरी येथे ‘आपदा सखी’ प्रशिक्षणाला प्रांरभ

रत्नागिरी, ४ फेब्रुवारी २०२३ : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने व एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी, धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आयोजित बॅच क्रमांक ३, ‘आपदा सखी’ प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (ता. ३ फेब्रुवारी २०२३) सकाळी अकरा वाजता संपन्न झाला.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आवार येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग वैशाली नारकर, जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एन. एन. पटेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, मुख्य प्रशिक्षक बिमल नाथवानी, सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, रत्नागिरी मिलिंद जाधव आदी उपस्थित होते.

अपर जिल्‍हाधिकारी शुंभागी साठे, अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग वैशाली नारकर, अधीक्षक भूमी अभिलेख पटेल, पत्रकार शोभना कांबळे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेला आपदा सखींचे कौतुक केले. आपल्याला मिळालेल्या संधीचे सार्थक करा, अशा शुभेच्छा दिल्या.

सदर बॅच ही २ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १२ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणाची असून त्यामध्ये एकूण ६० महिला स्वयंसेवकांनी भाग घेतलेला आहे. सदर स्वयंसेवकांना १२ दिवासाचे आपत्ती व्यवस्थापनविषयक निवासी प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था, प्रशिक्षणाला येणा-जाण्याचा प्रवास भत्ता, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र, ओळखपत्र, विमा कवच, ड्रेस कोड (टी-शर्ट), सेफ्टी किट या सुविधा देण्यात येणार आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा