विधानसभा अधिवेशन लवकरात लवकर घ्यावे: अशोक गहलोत

जयपुर (राजस्थान), दि. २५ जुलै २०२०: राजस्थान मध्ये सत्तेविषयी संभ्रम अजून देखील कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राज्यपाल कालराज मिश्र हे दोघेही आपापल्या स्थानी निश्चित आहेत. सोमवारी विधानसभेचे अधिवेशन बोलवावे अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे जेणेकरून ते आपली शक्ती दर्शवू शकतील, तर राज्यपालांचा असा युक्तिवाद आहे की निर्णयावर पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागतो.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या आमदारांशी बैठक घेवून कायदेशीर पर्याय आणि राजकीय शस्त्रास्त्रांवर गंभीर विचारमंथन केले. मुख्यमंत्र्यांसमोर आपले आमदार एकजूट ठेवण्याचे आव्हान आहे. खरंतर अशोक गहलोत यांना अशी भीती आहे की फ्लोर टेस्ट उशिरा झाली तर त्यांच्या हातातून तीन-चार आमदार निघून जातील. त्यामुळे ते लवकरात लवकर फ्लोर टेस्ट करून आपले मुख्यमंत्रीपद अबाधित राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

मध्यरात्रीपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक

शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता राजस्थान मंत्रिमंडळाची बैठक जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरू झाली. रात्री साडेअकरापर्यंत चाललेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारला कसे वाचवायचे, हाच अजेंडा होता.

कॉंग्रेसला विधानसभा अधिवेशन हवे आहे

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना आता सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन हवे आहे, परंतु राज्यपाल कलराज मिश्रा कोरोना संकटाचे कारण आणि घटनात्मक तरतुदींचा अभ्यास यासाठी काही काळ मागत आहेत. गेहलोत यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले की राज्यपाल दबावाखाली आले आहेत. त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावले पाहिजे.

खरं तर, विधानसभेची एकमेव जागा अशी आहे की काँग्रेस त्यांच्या बाजूने आवश्यक असलेल्या आमदारांचा पाठिंबा दर्शवू शकेल. राज्यपालांवर दबाव आणण्यासाठी राजभवनात पोहोचले. तेथे त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलन देखील केले. इतकेच काय तर भूक लागल्यावर बिस्किटांचा आनंद देखील घेतला.

या सर्व घडामोडींनंतर अखेर राज्यपाल घराबाहेर पडले. त्यांनी आमदारांसोबत चर्चादेखील केली. त्यांनी आमदारांना विश्वास दिला की सध्या प्रकरण न्यायालयामध्ये आहे. कायदेशीर सल्लामसलत केल्यानंतरच विधानसभेचे सत्र बोलावले जाईल. राज भवन मध्ये तीन तास सुरू असलेला हाय व्होल्टेज राजकीय संघर्ष अखेर संपले आणि त्यानंतर सर्व आमदार हॉटेलमध्ये गेले. राजस्थान काँग्रेसचे आमदार गेल्या दहा दिवसांपासून जयपूर मधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा