बीसीसीआयच्या करारातून धोनीला वगळले

मुंबई: विश्‍वकरंडक नंतर भारताचा पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनी बराच काळ क्रिकेट पासून विलुप्त राहिला होता. विश्वकरंडक संपताच त्याची तैनात कश्मीर खोऱ्यामध्ये करण्यात आली होती. तेथील त्याची कामगिरी पूर्ण करून तो आता त्याच्या घरी परतला आहे. धोनी पुन्हा क्रिकेटमध्ये प्रदार्पण करणार का अशी उत्सुकता सर्वच चाहत्यांमध्ये लागून राहिली होती.

परंतु आता धोनी संबंधित आणखी एक न आवडते बातमी समोर आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी आपला वार्षिक करार जाहीर केला आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव या यादीत समाविष्ट झाले नाही. त्यावरून असा अंदाज वर्तविला जात आहे की धोनीची कारकीर्द जवळपास संपली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते की यष्टीरक्षक फलंदाजाची टी -20 कारकीर्द अद्याप जिवंत आहे. रवि शास्त्री यांनी एका मुलाखतीत धोनीबद्दल बोलताना सांगितले की, दोन विश्वकरंडक जिंकणारा कर्णधार कधीही संघावर स्वत: ला ठोपावत नाही.

हा शेवटचा सामना खेळला गेला
महेंद्रसिंग धोनीने शेवटचा सामना २०१९ च्या विश्वचषकात खेळला होता. टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील पराभव झाल्यापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा