भारताचा वेस्ट इंडिजवर १०८ धावांनी विजय

नवी दिल्ली : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना अतिशय रंगतदार झाल्याचे पहायला मिळाले.
रोहित शर्मा व लोकेश राहुल यांची शतकी खेळी, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची फटकेबाजीने टीम इंडियाला ५ बाद ३८७ धावांचा डोंगर उभा करून दिला.
दरम्यान विंडीजचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतवले. मात्र शे होप व निकोलस यांनी पूर्ण केलेल्या जिगरबाज खेळीने सामन्यातील रंजकता कायम ठेवली होती. मोहम्मद शमीने दिलेले दोन धक्के व त्यानंतर कुलदीप यादवच्या विक्रमी हॅटट्रिकने सामना टीम इंडियाच्या खिशात घातला. भारताने हा सामना १०८ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा