बिहार सरकारची १५ पान मसाला कंपन्यांवर बंदीची मागणी

बिहार: पान मसाला मध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या पान मसाला मुळे कॅन्सर सारखे गंभीर रोग जडण्याची ही शक्यता असते. पानमसाला मूळ कॅन्सर मधील ५० टक्के रुग्ण हे मृत्यूमुखी पडतात. हा आकडा भयावह आहे. त्यामुळे बिहार सरकारने या कंपन्यांवर व त्यांच्या उत्पादनावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅल्शियम कार्बोनेट मुळे कोणत्या धोका आहे?

आजपासून तीस-चाळीस वर्षांपूर्वी पान मसाला हा प्रकार अस्तित्वात नव्हता. याआधी पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येणारी पाने खाल्ली जात होते. यामध्ये पान, सुपारी व इतर पदार्थांचा वापर करून हे पान बनवले जात असे. परंतु या पानांमुळे आरोग्याला एवढा धोका उत्पन्न होत नसे.

परंतु गेल्या तीस वर्षापासून पान मसाला नवीन प्रकार अतिशय लोकप्रिय झाला आहे. यामध्ये कंपन्या पारंपारिक पान पद्धती चालू आली होती त्यामध्ये बदल करून आता पान व सुपारी व इतर काही केमिकल्स टाकून त्याचे पावडर छोट्या छोट्या पुड्यांमध्ये विकले जात आहे जाते ह्याला पान मसाला गुटखा असे म्हणतात. परंतु चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की या पान मसाला मध्ये कॅल्शियम कार्बोनेट चे प्रमाण २ टक्‍क्‍यांपर्यंत दिसून आले आहे.

या कारणावरून या कंपन्यांना राज्य सरकारांनी कोर्टा मोठे ओढले होते परंतु येथे या कंपन्यांनी वेगवेगळी कारणे देऊन आपल्यामध्ये कोणतीही चूक नसल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार कंपन्या यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट टाकत नाही तर त्यामध्ये वापरल्या गेलेल्या वेगवेगळ्या घटकांतील रासायनिक अभिक्रिया मुळे कॅल्शियम कार्बोनेट तयार होत आहे. लाईम पावडर किंवा यांसारख्या इतर पदार्थांमुळे कॅल्शियम कार्बोनेट तयार होत आहे त्यामुळे यामध्ये आमचा कोणताही दोष नाही असा कंपन्यांचा दावा आहे.

सुपारी किंवा पान यामध्ये व्यसनाधीनता वाढविण्याची क्षमता असते परंतु त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट टाकल्यास एखाद्या व्यक्तीला व्यसनाधीन बनवण्यासाठी हे एक घातक मिश्रण तयार होते. कॅल्शियम कार्बोनेट मानवी शरीरातील मांस पेशी मध्ये आढळून येते. कॅल्शियम कार्बोनेट शिवाय मांस पेशी मधील अकसणे व विस्तारित होणे हे कार्य होऊ शकत नाही. हे कार्य चालू राहण्यासाठी शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असणे गरजेचे आहे. परंतु हे कॅल्शियम कार्बोनेट अतिप्रमाणात शरीरामध्ये गेल्यास त्याचा धोकाही निर्माण होतो. कॅल्शियम कार्बोनेटचे मुख्यता काम मांसपेशींना आराम प्रदान करणे तसेच हृदयाचे आकुंचन व प्रसरण या कार्यास मदत करणे यात उपयोग होतो. त्यामुळे अती कॅल्शियम कार्बोनेट शरीरात गेल्यास रक्तदाब ठराविक मानकांचे पेक्षा कमी होतो. त्यामुळे पान मासाला चे सेवन करणाऱ्यास एक वेगळा अनुभव अनुभवास मिळतो. परंतु कालांतराने हृदयाच्या कार्यात यामुळे परिणाम दिसण्यास सुरुवात होते. रक्तदाब कमी होऊन हृदयाचे काम थांबण्याची शक्यता यामध्ये असते.

याव्यतिरिक्त तोंडाचा कॅन्सर घशाचा कॅन्सर यांसारखे गंभीर रोग होण्यास देखील हे कारणीभूत ठरते त्यामुळे पान मसाल्यांमध्ये कॅल्शियम कार्बोनेट मिळवल्यामुळे एकूणच पान मसाल्याचे नुकसान वाढतात त्यामुळे जवळजवळ सर्वच राज्यांनी गुटखा व पानमसाला कंपन्यांवर व त्यांच्या उत्पादनांवर बंदी आणली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा