भाजप- शिवसेनेची भांडणे फक्त पैसा आणि सत्तेसाठी- अण्णा हजारे

पारनेर: सध्या राजकारणात भाजप आणि शिवसेनेची सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेली रस्सीखेच केवळ सत्ता आणि पैशांसाठी आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे केली.

राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी हजारे म्हणाले की, निवडणुकीमध्ये त्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले होते.मग आता नेमकी भांडण चालली आहेत ती कशासाठी? त्यामागे स्वार्थ आहे. केवळ सत्ता आणि पैसा यासाठी हे दोन्ही पक्ष आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे त्यांच हे जे काही आहे ते समाज हितासाठी नाही. असेही हजारे म्हणाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा