गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय भारताच्या अमेरिकेसोबतच्या युद्ध सरावाला चीनने केला विरोध, भारताने दिले हे उत्तर

भारताच्या अमेरिकेसोबतच्या युद्ध सरावाला चीनने केला विरोध, भारताने दिले हे उत्तर

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट २०२२: भारताच्या अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित युद्ध सरावाला चीनने कडाडून विरोध केला आहे. सीमेशी संबंधित वादात तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपाच्या विरोधात असल्याचे चीनने म्हटले आहे. भारत ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधील औली येथे अमेरिकेसोबत महायुद्ध सराव करणार आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की भारताने द्विपक्षीय कराराचे पालन करणे अपेक्षित आहे ज्यामध्ये दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ युद्ध सराव करणार नाही असे मान्य केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पूर्व लडाखमध्ये चीन या कराराचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये बराच काळ तणावाचे वातावरण होते.

चीनच्या राष्ट्रीय संरक्षण दलाचे वरिष्ठ कर्नल टॅन केफेई यांनी ऑक्टोबरमध्ये भारत आणि अमेरिकेच्या विशेष सैन्याने हिमालयाच्या दक्षिणेकडील भागात युद्धाभ्यास केल्याच्या वृत्ताला आपली प्रतिक्रिया दिली आहे. वरिष्ठ कर्नल टॅन केफेई म्हणाले, “चीन आणि भारत यांच्यातील सीमा विवादात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला आमचा ठाम विरोध आहे.”

कर्नल टॅन म्हणाले की, चीन नेहमीच दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य, विशेषत: युद्ध सराव आणि प्रशिक्षणाशी संबंधित क्रियाकलाप कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करून करू नये यावर भर देत आहे. त्याऐवजी, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, चीन आणि भारत यांच्यातील सीमावाद हा दोन देशांमधील आहे आणि दोन्ही देशांनी सर्व स्तरांवर प्रभावी चर्चा केली असून चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचे मान्य केले आहे.

चीनचे म्हणणे आहे की १९९३ आणि १९९६ मधील भारत आणि चीन सरकारमधील करारांच्या प्रकाशात, कोणतीही बाजू प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्करी करार करू शकत नाही. कर्नल टॅन म्हणाले, “दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या सहमतीचे आणि संबंधित करारांचे भारतीय बाजू काटेकोरपणे पालन करेल आणि द्विपक्षीय मार्गांद्वारे सीमा समस्या सोडवण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवेल आणि व्यवहारात शांतता राखेल अशी अपेक्षा आहे.”

या मुद्द्यावर चीनचा आक्षेप भारताने साफ फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की चीनचा तृतीय पक्षाचा हस्तक्षेप पूर्णपणे संदर्भाबाहेर आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबत चीनचे विधान मला समजले नाही. भारत-अमेरिका सराव पूर्णपणे वेगळा आहे आणि त्याला कोणता रंग देण्यात आला आहे हे मला माहीत नाही. “हे कोणाला लक्ष्य करून केले जात आहे का? किंवा हा लष्करी सराव कोणत्याही विद्यमान कराराचे उल्लंघन आहे.

सीमेवर चीनच्या कोणत्याही कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असून दीर्घकालीन संबंध एकतर्फी असू शकत नाहीत, यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version