मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा इर्शाळवाडीत, निवारा केंद्राची केली पाहणी

खालापूर, १५ ऑगस्ट २०२३ : काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अनेक गावकऱ्यांचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला. इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला. सरकार इर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या पाठीशी ठीम उभे राहिले. सरकारने मदतीचा हात पुढे करत इथल्या रहिवाशांसाठी खालपूर चौक या भागात एक सुंदर गाव उभे केले आहे. सरकारकडून इर्शाळवाडी ग्रामस्थांना अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

सरकारकडून पुरवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळी दोनशे जणांचे जेवण, वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी नर्सरी, खेळण्यासाठी मैदान, २४ तास गरम आणि थंड पाणी, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन,अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी रहिवाशांसाठी करण्यात आली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी असलेल्या निवारा केंद्राची पाहणी केली. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधला. इर्शाळवाडी दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या ग्रामस्थांच्या येथील ताप्तुरत्या निवारा केंद्रात एकूण १४४ आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा