गोल पोस्ट महाराष्ट्र नागपूर सांगली मधील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोना संक्रमण

सांगली मधील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोना संक्रमण

इस्लामपूर: देशभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ५८२ पुष्टी झालेल्या प्रकरणे सापडली आहेत. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ लोक बरे झाले आहेत. म्हणजेच ५३५ प्रकरणे अद्याप कार्यरत आहेत. या दरम्यान सांगलीतल्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सांगलीतील करोना रुग्णांची संख्या ९ वर तर राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११२ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र व केरळ सर्वाधिक त्रस्त आहेत. महाराष्ट्रात ११२ आणि केरळमध्ये १०५ रुग्ण आढळले आहेत.

इस्लामपूर येथे दोन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्याचं सोमवारी उशिरा स्पष्ट झालं होतं. हे चारही जण हजहून आले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले होते. तसेच बसस्थानकावरून शहरात येणारा मुख्य रस्ता, गांधी चौक परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यानंतर प्रशासानाने त्यांच्या कुटुंबाशी निगडीत ३९ लोकांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन केले होते. प्रशासनाने सुमारे २५० लोकांना होमक्वारंटाइन केले होते. निगराणीखाली असलेल्या या ३९ जणांपैकी ५ जणांचे रिपोर्ट आले असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या

पिंपरी-चिंचवड १२, पुणे १९, मुंबई ४१, नवी मुंबई ५, कल्याण डोंबिवली ५, नागपूर ४, यवतमाळ ४, अहमदनगर ३, ठाणे ३, सातारा २, पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण प्रत्येकी १

कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांची लॉकडाऊन जाहीर केली. हे लॉकडाउन आजपासून लागू केले गेले आहे आणि ते १४ एप्रिलपर्यंत चालतील. कार्यालये, बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक सर्व बंद आहेत. या देशातील कोणीही या २१ दिवसांपासून आपल्या घराबाहेर पडणार नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या काळात केवळ जीवन आवश्यक सेवा सुरू राहतील.

error: Content is protected !!
Exit mobile version