कोरोनाचे युद्ध जिंकणारच – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद ,२५ एप्रिल २०२० : नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या सहकार्यातून कोरोनाचे युद्ध जिंकणारच, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला विश्वास आपण सर्व मिळवून सार्थ ठरवू, असा विश्वास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज औरंगाबाद येथे व्यक्त केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मुंबई येथून पालकमंत्री देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व डॉक्टर यांची उपस्थिती होती.
व्हेंटीलेटर उपलब्धता, दुकानदारांच्या तक्रारी व केलेली कारवाई, शिवभोजन थाळीची तत्काळ पूर्तता करणे, पवित्र सण रमजानच्या अनुषंगाने पोलिस विभागाने घ्यावयाची खबरदारी व कार्यवाही, कोरोनाच्या मृत रुग्णाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी करावयाची कार्यवाही आदींबाबत देसाई यांनी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेत सूचना केल्या.
लोक प्रतिनिधींच्या मौलिक सूचनांची नोंद घेतल्याचे सांगत, शासनस्तरावरून या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे पालकमंत्री देसाई म्हणाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा