कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा झटका! अर्थव्यवस्था रुळावर येण्यास लागतील 15 वर्षे -आरबीआय

नवी दिल्ली, 1 मे 2022: कोरोनाच्या काळात जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. भारताची अर्थव्यवस्थाही यापासून अलिप्त राहिली नाही. प्रथम संपूर्ण लॉकडाऊन आणि नंतर अनेक लहान लॉकडाउनमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचं बरंच नुकसान झालं. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) म्हणते की यातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी 15 वर्षे लागतील.

आरबीआयने जारी केला अहवाल

RBI ने अलीकडेच 2021-22 साठी चलन आणि वित्त (RCF) वरील अहवाल प्रसिद्ध केला. याच अहवालात मध्यवर्ती बँकेने म्हटलंय की, कोरोना महामारीमुळं अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी 15 वर्षे लागतील. हा अहवाल भारतीय अर्थव्यवस्थेचं भीषण चित्र मांडतो. या अहवालाची थीम Revive and Reconstruct आहे, जी कोविड नंतर शाश्वत रिकवरी आणि मध्यम कालावधीत वाढीचा कल वाढविण्याच्या संदर्भात तयार करण्यात आली आहे.

या 7 चाकांवर धावेल अर्थव्यवस्थेची गडी

RBI ने आपल्या अहवालात अर्थव्यवस्थेचा वेग बदलण्यासाठी 7 महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहं. त्यात एकूण मागणी वाढवणं, त्यानुसार पुरवठा करणं समाविष्ट आहे. त्याच वेळी, त्याला त्याच्या संस्था, मध्यस्थ आणि बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करावं लागंल, स्थूल आर्थिक स्थिरता, उत्पादकता आणि तांत्रिक प्रगती यांच्याशी समन्वय साधताना, संरचनेतील बदलांसह त्याच्या टिकाऊपणावर भर द्यावा लागंल.

सरकारी कर्ज कमी करावं लागेल

एवढेच नाही तर देशाचे आर्थिक आरोग्य चांगले राहावे यासाठी आरबीआयने सरकारवरील कर्जाचा बोजा कमी करण्याबाबतही बोलले आहे. मध्यवर्ती बँकेचे म्हणणं आहे की जर भारताला मध्यम मुदतीत वाढ सुरक्षित ठेवायची असेल तर पुढील 5 वर्षांत सरकारवरील कर्जाचा बोजा GDP च्या 66% च्या खाली आणावा लागंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा