अनुष्का आणि गावस्कर मध्ये क्रिकेट मॅच

मुंबई ,२५ सप्टेंबर २०२० : विरूष्का अर्थात विराट आणि अनुष्का यांची जोडी तरुणाई मधे प्रसिद्ध आहे. तर अलीकडेच या जोडीने चाहत्यांसाठी गुड न्यूज दिली होती. विराटचे नाव जिथे आले तिथे अनुष्काचे नाव हामकास पुढे येते. पण ते अनुष्काला फारसं पटलेलं दिसत नाहीये. तर नुकतेच याच एका विषयावर तिने सुनील गावस्कर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आपीएलच्या १३ व्या हंगामातील आरसीबी आणि पंजाब सामन्यादरम्यान समलोचनावेळी सुनील गावस्कर यांनी टिका केली. विराटची सुमार कामगिरी बघून “लाॅकडाऊन था तो सिर्फ अनुष्का के बाॅलिंग प्रॅक्टीस कि इन्होंने” असं गावस्करांनी म्हटंल.

सुनील गावस्कर यांच्या या विधानामुळे अनुष्का नाराज झाल्याचे पहायला मिळाले. तिने गावस्कर यांना प्रत्युत्तर दिले. “तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा आहे. पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं? क्रिकेटमध्ये माझे नाव ओढणे कधी थांबेल? असा सवाल तिने उपस्थित केलाय.

तर या सर्व पार्श्वभूमीवर विराट कोहली काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या प्रकरणावर तो काय मत व्यक्त करतो हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा