पुण्यात सायबर फसवणुकीचा सुळसुळाट: आमिषांना बळी पडून नागरिक गमावतायेत लाखो रुपये!

29
A digital illustration showing a worried young Indian man sitting indoors with a smartphone in his hand, surrounded by symbolic visual cues of cyber fraud—such as warning icons, anonymous hacker figures, and digital currency symbols—highlighting the concept of online scams and financial fraud. The overall atmosphere is tense and cautionary.
पुण्यात सायबर फसवणुकीचा सुळसुळाट:

Cyber ​​fraud rampant in Pune: सायबर चोरांनी पुण्यात अक्षरशः थैमान घातले असून, सर्वसामान्य नागरिकांना विविध आमिषे दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ फायद्याच्या मोहापायी नागरिक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत आणि स्वतःच्या कष्टाचे लाखो रुपये गमावत आहेत. पर्वती आणि बाणेर पोलिस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारींनुसार, सायबर चोरांनी तब्बल ४४ लाख ५१ हजार ६२४ रुपयांची फसवणूक केली आहे.

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक;

लक्ष्मीनगर येथील एका ४० वर्षीय व्यक्तीने पर्वती पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सायबर चोरांनी त्यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने २१ लाख ६२ हजार ६०० रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी त्यापैकी ८ लाख ५० हजार रुपये परत केले असले तरी, उर्वरित १३ लाख १२ हजार ६०० रुपये अद्यापही परत केलेले नाहीत. पोलिस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २५ लाखांचा गंडा

दुसऱ्या एका घटनेत, बाणेर येथील इचलॉन सोसायटीमधील एका ४० वर्षीय तक्रारदाराची फसवणूक झाली आहे. १ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत, सायबर चोरांनी स्वतःला बुल मार्केट इंटरनॅशनल शेअर ट्रेडिंग कंपनीचे एजंट असल्याचे भासवून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने २५ लाख ८९ हजार २४ रुपयांची गुंतवणूक केली, परंतु त्यांना मूळ रकमेसह कोणताही परतावा मिळाला नाही. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

५ लाखांपेक्षा अधिक रक्कम गमावली महिलेने

तिसऱ्या घटनेत, बाणेर येथील रोहन सहेर येथील ५१ वर्षीय महिलेनेही सायबर फसवणुकीची तक्रार दिली आहे. या महिलेने ५ लाख ५० हजार रुपये गुंतवले, परंतु त्यांनाही कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम परत मिळाली नाही.
नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे