कधी न भेटलेली प्रिय हिरकणी….

निसर्गासाठी छोट्या मुंगीपासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्षापासून ते माणसापर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान असतात, मात्र, माणूस यात बसत नाही का? की माणूस निसर्गापेक्षा मोठा आहे. कारण निर्गगाचे नियम माणूस सोडून सगळेच जण पाळतात. असेच म्हणावे लागेल. कारण माणूसही इतका क्रूर असू शकतो. याची कल्पना या घटनेतून स्पष्ट होते.

नैसर्गिक नियम असा सांगतो की, कुठलाही प्राणी एकमेकांच्या इच्छेशिवाय काही करू शकत नाही. कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही. पण स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी आई बापाच्या डोक्यात दगड घालयाला कमी न करणारा माणूसच असतो. मग या केरळ मधल्या गर्भवती हत्तींनीच काय झालं असेल. विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

सध्या सोशल मीडियावर नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटो मागची अत्यंत करून कहाणी आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. २७ मे २०२० रोजी केरळ राज्याच्या एका फॉरेस्ट ऑफिसर ने मोहन कृष्णन ने “माफ कर बहिणी” म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली.

सायलेंट वॅलीधून एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली. त्याही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाही, कुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली!

ती चालत असताना तिला शेवटी नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांतपणे उभी राहिली. वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोहोचले. तिने बाहेर यावं म्हणून दोन हत्ती सुद्धा पाण्यात सोडले. तिला वाट दाखवण्या करता पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली! दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले पण ५ च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली. पोस्टमोर्टममध्ये समजलं की, ती गर्भवती होती.

याबाबत मोहन कृष्णन यांनी लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण तिने तो नाकारला. कदाचित माणसाच्या या कृतीचा तिने केलेला तो निषेध असावा. कारण तिला माणूस या प्राण्यावर विश्वास तिला ठेवावा वाटला नाही! त्यामुळेच कदाचित तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं असावं.

हत्तीचे बाळ बाहेर यायला २० महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र या नदीत उभ्या राहिलेल्या हत्तींनीच्या काय भावना असतील ? तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती? वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती ? अशा अनेक गोष्टींची उत्तर ही अनुत्तरित आहे. या हत्तींनीच्या मृत्यूला कारण फक्त माणूसच आहे.

आई आपल्या लेकरांना जगवण्यासाठी काय काय करत असते. आपल्या बाळाला दूध मिळावे म्हणून १२०० फुटांचा कडा हिरकणी चढून गेली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वतः चे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाहीतर प्राण्यांमधली!

एका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं आपण? असं समजण्याचं अजिबात कारण नाही की, तुम्ही घरात बसला आहात म्हणून तुम्ही जबाबदार नाही. माणूस म्हणून केलेल्या असल्या हीन अत्याचाराची फळे (collective fate) सामूहिक नशिबाच्या रूपाने प्रत्येक माणसाच्या वाट्याला भोगायची येतात. कदाचित आता आपल्या सर्वांच्या आयुष्यात घडत असलेली घटना त्याचेच फळ असेल. कोरोना, चक्रीवादळ, आग ही सगळी प्रलयाची रूपे भूतकाळात केलेल्या पापाची गोळाबेरीज तर नसेल ना ? असा प्रश्न जरी माझ्या मनात आला तरी त्या नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हिरकणी हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो.

डोळ्यात खळणारं पाणी थांबवण अवघड होऊन जातं!
एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित माणसांनी बनवलेल्या कोर्टात होणार नाही. पण लक्षात ठेवा जेंव्हा निसर्ग न्याय करायला उतरेल तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही! या मृत्यूचा न्याय व्हावा. या गोष्टी तुन मानवाने शिकवण घेण्याची गरज आहे.. बदलण्याची गरज आहे. कदाचित त्या हत्तींनीला फटाक्यांने भरलेला अननस खाऊ घातला नसता, तर ती आज वाचली असती.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा