पतंग उडविताना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या बालकाचा मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील घटना

पुणे, १६ जानेवारी २०२३ : हिंगोणा (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे पतंग उडविणार्‍या दहावर्षीय बालकाचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (ता. १५) दुपारी दोन वाजता घडली. अक्षय संजय महाजन (१०, रा. कळमसरे, ता.अमळनेर, ह.मु. हिंगोणे,ता. धरणगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. ऐन संक्रांती सणालाच घडलेल्या दुर्घटनेमुळे हिंगोणे गावात शोककळा पसरली आहे.

हिंगोणणे येथे मकर संक्रांत सणानिमित्त संजय महाजन- माळी यांचा पाचव्या इयत्तेत शिक्षण घेणारा अक्षय हादेखील पतंग उडवीत होता; मात्र याप्रसंगी त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडल्याने त्याची प्राणज्योत मालवली. गावात ही वार्ता कळताच ग्रामस्थांनी धाव घेत अक्षयला बाहेर काढले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा