डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप करण्यात आलं. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराकडं सगळ्याचं लक्ष आहे.
विशेषतः मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असणाऱ्यांनाही मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी सहा जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
अधिवेशन संपल्यानंतर मावळत्या वर्षाच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची सुय्रांकडून माहिती मिळत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी सहाजणांचा समावेश असणार आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षामधील रामदास कदम, गुलाबराव पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, धनंजय यांच्यासह प्रमुख नेत्यांची स्पर्धेत आहे.

शिवसेना –
रामदास कदम, अनिल परब, सुनील प्रभू, दीपक केसरकर, उदय सामंत, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, आशिष जैस्वाल, संजय राठोड, सुहास कांदे.

काँग्रेस –
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, सतेज पाटील, के.सी. पाडवी, विश्वजीत कदम.

राष्ट्रवादी –
अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा