देवेंद्र फडणवीस शब्द पाळत नाहीत? आयुष्यभर ब्रम्हचारी राहीन म्हणणारे काय करत आहेत, सुषमा अंधारे यांची टीका

मुंबई, १६ ऑगस्ट २०२३ : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. सुषमा अंधारे या तीन महिन्यांत तिसऱ्यांदा अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अंधारे अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहेत. याचदरम्यान त्यांनी सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यांचा स्वतःचाच शब्द पाळत नाहीत. कारण याच्या आधी त्यांनी मी ब्रम्हचारी राहीन पण राष्ट्रवादीबरोबर युती नाही नाही असे म्हटले होते. पण आता काय करत आहेत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. तर सोमय्या यांचा गेम त्यांच्यात पक्षातील त्यांच्याच लोकांनी केला असेही त्या म्हणाल्या. कारण तो सगळ्यांच्या मागे ईडी लावतो. त्यामुळे तुझीच माणसे सीडी घेऊन बसलेत असा टोला देखील अंधारे यांनी लगावला आहे.

तर देवेंद्र फडणवीस आपला शब्द पाळत नसतील तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार हे कशावरून? ते शब्द पाळतील हे कशावरून? तर एक जण म्हणत आहे, ३० तारखेपर्यंत आणखीन एक गौप्यस्फोट होईल? आता हा कोणता असेल? की त्याचा नेता खाली पाय उतार होऊन अजित पवार हे मुख्यमंत्री होतील? हे काही सांगता येत नाही, असेही यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा