महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने दाखल केले आरोपपत्र, अजित पवारांचे नाव नसल्याने ; चर्चांना उधाण

मुंबई, १२ एप्रिल २०२३: महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या आरोपपत्रात अजित पवार यांचे नाव नाही असे सांगण्यात आले आहे. ईडीने या प्रकरणाचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध या प्रकरणात कोणतेही तथ्यात्मक पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रात पाठवण्यात आलेले नाही.

सध्या तरी अजित पवार आणि त्यांच्या पत्नीसाठी हा मोठा दिलासा आहे. मात्र, या आरोपपत्रावरील सुनावणी अद्याप उच्च न्यायालयात झालेली नाही. माहितीनुसार, उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतरच या प्रकरणातील आरोपपत्र स्वीकारून न्यायालय अजित पवारांना दिलासा देत राहणार की दाखल केलेले आरोपपत्र काही मार्गदर्शक तत्त्वांसह परत करणार, हे निश्चित होईल.

अशा स्थितीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी या आरोपपत्रावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी आजपर्यंत ईडीने अजित पवारांना चौकशीसाठी कधीही समन्स बजावलेले नाही. २०२१ मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ईडीने एकत्रितपणे ६५ कोटी रुपयांच्या हेराफेरीचा आरोप केला होता. यासह ईडीने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि मशिनरी आणि इतर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा