गोल पोस्ट इतर सरकारी योजना स्वस्त होऊ शकते खाद्यतेल, कंपन्यांशी सरकारची चर्चा

स्वस्त होऊ शकते खाद्यतेल, कंपन्यांशी सरकारची चर्चा

नवी दिल्ली, 7 जुलै 2022: वाढत्या महागाईच्या काळात लोकांना दिलासा देणारी बातमी मिळू शकते. खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने उद्योगांची बैठक बोलावली होती. या बैठकीत खाद्यतेलाचे दर कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात घसरण होऊ शकते. गेल्या महिन्यातही काही तेल कंपन्यांनी मोहरी तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली होती. मात्र, आतापर्यंत कमी झालेल्या किमतीचा परिणाम किरकोळ दरावर दिसत नाही.

गेल्या महिन्यात कट

सध्या जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती घसरल्या आहेत. आता सरकार जागतिक किरकोळ किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम पाहण्याचा प्रयत्न करत आहे. ‘धारा’ ब्रँडच्या खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी आणि अदानी विल्मार या सहकारी कंपनीने गेल्या महिन्यात दर कपातीची घोषणा केली. मदर डेअरीने 15 रुपये प्रति लिटर आणि अदानी विल्मरने 10 रुपये प्रति लिटर कपात जाहीर केली होती.

10-15 रुपयांनी होऊ शकते स्वस्त

सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) चे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता यांनी सांगितले की, खाद्यतेलाच्या किमती गेल्या महिन्यात प्रति टन $300-450 ने खाली आल्या आहेत. त्यामुळे तेल निर्माते पुन्हा एकदा दरात कपात करण्याची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावेळीही प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

लवकरच आदेश जारी केला जाऊ शकतो

जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या घसरलेल्या दराचा परिणाम देशांतर्गत किरकोळ बाजारात सध्या दिसून येत नाही. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी 22 जून रोजी सांगितले होते की किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती खाली येऊ लागल्या आहेत. घसरणीचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार आणि उद्योग यांच्यातील बैठकीनंतर लवकरच तेलाच्या किमती कमी करण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात.

भारत आयात करतो 60% तेल

भारत हा जगातील सर्वात मोठा पाम तेल आयातदार देश आहे. गेल्या काही आठवड्यांत रशिया आणि अर्जेंटिनासारख्या देशांतून देशातील सूर्यफूल तेलाचा पुरवठा वाढला आहे. भाकर युक्रेन आणि रशियाकडून सूर्यफूल तेल खरेदी करते. युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची शिपमेंट सध्या थांबली आहे. आता भारत रशियाकडून अधिक आयात करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आपल्या खाद्यतेलाच्या 60 टक्क्यांहून अधिक गरजा आयातीद्वारे भागवतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version