राज्यातील भ्रष्टाचार प्रकरणी ३६ शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे एसीबीला पत्र

मुंबई, ६ जून २०२३ : मुलांच्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील नवीन पिढी घडवण्याचे कार्य शिक्षक करत असतो. परंतु शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ३६ शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एसीबीला लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे आयुक्तांनी एसीबीला पत्र लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात परंतु पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात परंतु कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती समजते. ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली चौकशी करण्याच्या मागणी बाबत एसीबीला लिहिलेल्या पत्रात सूरज मांढरे यांनी मागणी केली आहे. काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. शिक्षक बदल्यांसाठी लाच घेताना अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याच्या अनेक घटना समोर आल्य. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांना सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षात आपण पाहिली आहे. एवढच काय तर शिक्षक बदलीसाठी दरपत्रक देखील ठरल्याच्या चर्चा आहेत. साधी फाईल एका टेबल वरून दुसऱ्या टेबलवर पाठवण्यासाठी देखील पैसे घेतले जातात. एका प्रकरणात फाईल आउटवर्ड करून देण्यासाठी वीस हजार रुपयेची लाच घेण्यात आली.पैशाच्या मोबदल्यात बदल्या केल्या जाता आहेत. ज्ञानदान हे पवित्र दान म्हणून ओळखले जाते, परंतु हल्ली सरकारी कार्यालये, पोलिस स्थानकात भ्रष्टाचार चालतोच, परंतु पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो त्या शिक्षण क्षेत्रात देखील भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. गेल्या काही वर्षात एसीबीने उघड केलेली प्रकरणे पाहता भ्रष्टाचाराचा हा चढता आलेख चिंता वाढवणरा आहे. न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा