पुणे, 1 जुलै 2022: एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. सायंकाळी 7.30 वाजता त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर कालपासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
असा होता रिक्षाचालक ते मंत्री प्रवास
9 फेब्रुवारी 1964 रोजी महाराष्ट्रात जन्मलेले एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी तालुक्यातील असून ते मराठा समाजातील आहेत. एकनाथ शिंदे यांचे अकरावीपर्यंतचं शिक्षण ठाण्यात झालं आणि त्यानंतर यांनी वागळे इस्टेट परिसरात राहून रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी ऐंशीच्या दशकात ऑटो रिक्षा चालवत शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरू केला.
![](https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/WhatsApp_Image_2022-07-01_at_6.42.36_AM__1__mGHn7hUsQ.jpeg?ik-sdk-version=javascript-1.4.3&updatedAt=1656643631581)
![](https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/WhatsApp_Image_2022-07-01_at_6.42.36_AM__1__mGHn7hUsQ.jpeg?ik-sdk-version=javascript-1.4.3&updatedAt=1656643631581)
महाराष्ट्राची राजधानी मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रभावी नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची गणना होते. लोकसभेची निवडणूक असो की महापालिकेची ठाण्यात विजयासाठी एकनाथ शिंदे यांची साथ आवश्यक मानली जाते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत तळागाळातील कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि ठाण्यातील प्रभावी नेते आनंद दिघे यांचं बोट धरून पुढं सरसावले.
एकनाथ शिंदे 1997 मध्ये ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 2001 मध्ये ते महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर 2002 मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. याशिवाय तीन वर्षे शक्तिशाली स्थायी समितीचे सदस्य होते. मात्र, दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर दोनच वर्षांनी ते आमदार झाले, मात्र 2000 सालानंतर शिवसेनेतील राजकीय उंचीला स्पर्श करता आला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांचं 2000 साली ठाणे परिसरात निधन झालं. यानंतर एकनाथ शिंदे ठाण्यात पुढं सरसावले. दरम्यान, नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्षात वाढ होत गेला. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचा आलेख वाढला आणि ठाकरे कुटुंबाशीही जवळीक निर्माण झाली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी एकनाथ ठामपणे उभे राहिले.
एकनाथ शिंदे चौथ्यांदा आमदार
![](https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/WhatsApp_Image_2022-07-01_at_6.42.36_AM__2__NAFr8THN_.jpeg?ik-sdk-version=javascript-1.4.3&updatedAt=1656643630469)
![](https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/WhatsApp_Image_2022-07-01_at_6.42.36_AM__2__NAFr8THN_.jpeg?ik-sdk-version=javascript-1.4.3&updatedAt=1656643630469)
मातोश्रीच्या जवळच्या नेत्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचं नाव सर्वप्रथम घेतले गेले. एकनाथ शिंदे 2004 मध्ये ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचलेले शिंदे नंतर 2009, 2014 आणि 2019 मध्येही विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे देखील शिवसेनेच्या तिकिटावर कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक ते नगराध्यक्ष ते आमदार, मंत्री असा प्रवास केला.
2019 मध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील बलाढ्य मंत्र्यांपैकी एक होते. 2019 ची निवडणूक जिंकून ते चौथ्यांदा विधानसभेत पोहोचले तेव्हा शिवसेना आणि त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष भाजप यांच्यातील बोलणी आणखी बिघडली. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड होण्याची अटकळ होती. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
शिंदे यांचं नाव यापूर्वीही होतं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत
2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात फक्त शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं होतं. हे वचन मी बाळासाहेब ठाकरे यांना दिलं होतं, असं उद्धव म्हणाले होते. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव सर्वात वेगानं पुढं आलं.
त्यावेळी शिवसेनेचे आमदार आणि नेतेही त्यांच्या नावाने तयार होते, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे यावर एकमत झालं नाही. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या. मात्र, त्याआधीच एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर्स लावण्यास सुरुवात केली होती.
एकनाथ शिंदे महाराष्ट्रात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या बाजूने होते, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मौन बाळगलं. अशा स्थितीत त्यांना उद्धव सरकारमध्ये शहर विकासासारखे मोठं मंत्रिपद देण्यात आलं, त्यावरून त्यांच्या राजकीय उंचीचा अंदाज बांधता येईल.
अपघातात मुलांचा मृत्यू
शिंदे यांनी त्यांची दोन मुलं अपघातात गमावली होती. साताऱ्यात त्यांचा मुलगा व मुलगी डोळ्यासमोर बुडाले. या घटनेनंतर शिंदे एकांतात आले. त्यांनी राजकारण सोडलं होतं. तेव्हा ते शिवसेनेचे नगरसेवक होते. मात्र आनंद दिघे यांनी त्यांना पुन्हा सार्वजनिक जीवनात आणले आणि ठाणे महापालिकेत सभागृह नेते केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे