मडकी बनवणाऱ्या कुंभार कुटुंबांवर उपासमारीची भिती

बारामती : राज्यात विट व्यावसायिक सोडून गाडगी मडकी बनविणारे २० हजार एवढी कुंभार कुटूंबे आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागणारे कुंभार माती कलश व उन्हाळी माट, डेरे, रांजण, सुरई विकण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. सणासुदीला लागणाच्या मातीच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतो. विक्रीसाठी ग्रामीण कारागीरांवर उपासमार होण्याची भीती अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाचे अध्यक्ष दत्ता कुंंभार यांनी व्यक्त केली
त्यासाठी कुंभार यांनी मुख्यमंत्री उध्दव टाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र पाठविले आहे.

अध्यक्ष कुंभार यांनी व्यावसायिक अडवणीत आल्याचे सांगत परवानगीसाठी साकडे घातले आहे. राज्यात ग्रामीण भागातील विट उद्योग चालू करणेसाठी नुकतीच परवानगी मिळाली
आहे. त्याबद्दल आम्ही कुंभार ऋणी आहे. राज्यातील कुंभार समाज आपला पारंपरिक वीट व्यवसाय तसेच पारंपरिक गाडगी, मडकी, माठ, रांजण, गणपती, व सणासुदीला लागणाच्या मातीच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतो.
या कारागीरांनी उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्यासाठी लागणारे उन्हाळी माठ,
रांजण व इतर वस्तू आदी लाखोच्या संख्येने बनवून ठेवले आहेत. या कुंभार कारागिरांना चार पैसे कमावण्याचा हा महत्त्वाचा सीझन असतो.

त्यावरच त्यांचा वर्षभर कुटुंब चरितार्थ चालतो. अचानकपणे आलेल्या या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश आज बंद आहे. कुंभारानी बनविलेल्या लाखो वस्तू ज्याची किंमत करोडो रुपये आहे. त्या रस्त्यावर बाहेर जावून विकता येतनसल्यामुळे घरात पडून आहेत. कुंभार लोक हे अतिशय छोट्या घरात राहतात. या वस्तू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जागा सुध्दा नाही. अन्यथा ग्रामीण कारागीरांवर उपासमारीने मरण्याची वेळ येण्याची भीती अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाचे अध्यक्ष दत्ता कुंंभार यांनी व्यक्त केली.

अक्षय तृतीयेला मातीचा कळस पूजन या सणानिमित्त घरो घरी होत असते. कुंभारसमाजाने त्यासाठी लाखो मातीची भांडी बनविली आहेत. ती संबधित माणसापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. तसेच कुंभार काम करणाºया व्यक्तीला त्यांनीबनविलेले हजारो उन्हाळी माठ, सुरया, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागणारीकुंभारी भांडी रोडवर तशेच गलोगल्ली विकण्यासाठी परवानगी देण्यात
यावी.प्रत्येक तालुक्यात ५० ते ६० कुटुंबांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी द्यावी लागणार आहे. सदर मातीच्या वस्तू न विकता घरात पडून
राहिल्यास कुंभार करागिरावर उपाशीपोटी राहण्याची वेळ येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

                                                                                          प्रतिनिधी – अमोल यादव 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा