भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, आव्हाडांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

ठाणे, ३१ जुलै २०२३ : महात्मा गांधी, ज्योतिबा फुले आणि साईबाबा यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणारे संभाजी भिडे हे सरकारचे दलाल असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांना तत्काळ अटक करावी; या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह नौपाडा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे.

मणिपूर प्रकरणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने होत आहेत. या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मनोहर भिडे यांनी सरकारकडून सुपारी घेतली आहे. संभाजी भिडे यांच्याकडून महात्मा गांधी यांचे पिता मुसलमान होते, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल गलिच्छ बोलून जातीय, सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तात्काळ भिडे यांना पोलिसांनी अटक करावी अन्यथा विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. त्याकरिता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटांच्या आमदारांना आवाहन करणार आहे. असे देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा