माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुरात प्रवेश बंद

कोल्हापूर, दि. ७ मे २०२० : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ता असा उल्लेख करून बदनामी केली आहे. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्‍त करण्यात येत आहे.

फडणवीस जोपर्यंत राजर्षी शाहू महाराज आणि जनतेची माफी मागत नाहीत. तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करण्यात येत आहे, असे पत्रकच संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, जगातील विद्वानांच्या यादीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. लोकराजा शाहू महाराजांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रसी म्हणजेच सामाजिक लोकशाहीचे स्तंभ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे फडणवीसांनी शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांचा इतिहास वाचून समजून घ्यावा, असे आवाहनही केले.
संपूर्ण देशभर ज्या राजांचा उल्लेख राजर्षी म्हणून केला जातो. त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणण्याचा कपटी दावा करणाऱ्या फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, भगवान कोईगडे, विकी जाधव, अभिजित कांजर, योगेश जगदाळे, उमेश जाधव यांनी पत्रक दिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा