पुणे, २९ मे २०२१: महिलांना प्रत्येक देशात एक वेगळ स्थान आहे. भारतात तर महिलांना देवी म्हणून पुजले जाते. मात्र अजूनही काही ठिकाणी त्यांच्या वर अत्याचार होतच असतो. पण प्रत्येक संघर्षात पुरून ठामपणे उभे राहतात त्या या स्त्रिया. अनेक वेळा अडचणी निर्माण झाल्या आसतील असंख्य संकटं याचा सामना करुन महिला आजच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा नाही तर त्यांच्या ही पुढे दोन पाऊले गेली आहेत आज त्यांच्या बद्दल च आपण काही रंजक गोष्टी वाचणार आहोत.
* स्त्रिया सहन करण्यात अधिक सक्षम असतात.
* त्यांचा मेंदू ऑक्सिटॉसिन अधिक निर्माण करतो.हा हार्मोन स्त्रियांना शांत राहण्यास मदत करतो.
* स्त्रियांची मेमरी पुरुषांच्या तुलनेत अधिक स्ट्राँग आसते.
* स्त्रियांचा मेंदू जलद गतीने विकसित होत असतो.
* स्त्रिया विज्ञान अधिक योग्य रितीने समजू शकतात.
* स्त्रियांना ह्रदयविकार ७० ते ८०च्या वयात होतो.जेव्हा की पुरुषांचे ह्रदय ५० ते ६० दरम्यानच थकू लागते.
वाचून बसला ना धक्का.स्त्रिया हे आजच्या आधुनिककाळातील महत्त्वाचा घटक आहे.जे एकेकाळी चूल आणि मुल या बंधनात जखडून ठेवलं गेलं होतं.आज ती या प्रगतशील राष्ट्र निर्मितीचा महत्त्वाचा अंग आहे.आज एक स्त्री घर,मुलं साभांळत नौकरी करण्याची जबाबदारी सहज पार पाडते.या सर्वात तिच्या बरोबर फक्त एक विश्वासाची साथ लागते ज्या मुळे ती हे त्रिसूत्र सहज पार करते.पण आजही देशातील अनेक भागात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते.त्यांचा छळ केला जातो हे दुर्दैव…….
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव