नवी दिल्ली: भारतीय संघाने नुकतीच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असा विजय मिळवला. याबरोबरच सलग चार कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवण्याचा विश्वविक्रम देखील भारतीय संघाने केला आहे.
यामध्ये मयांक अग्रवाल या भारतीय फलंदाजाने लक्षणीय कामगिरी केली आहे. मयांकनं २०१९ मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अव्वल स्थान पटकावलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार मयांकनं मोठी झेप घेतली आहे. परंतु त्याचवेळी रोहित शर्मा टॉप टेन फलंदजांमधून बाहेर गेला आहे.