आंबेगाव तालुक्यात घरपोच पोषण आहारात भ्रष्टाचार

मंचर : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून तीन ते सहा वयोगटातील बालकांना घरपोच पोषण आहार देताना आंबेगाव तालुक्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आसुन पोषण आहाराचा ठेकेदाराने निम्म्याच पुरवठा करून एक प्रकारे लहान बालकांना उपाशी ठेवले आहे.
आंबेगाव तालुक्यातील २३० अंगणवाडी केंद्रा मध्ये कडधान्य पावतीवर १५०० ग्रॅम वाटप करण्याचे आदेश असतानाही ७५० ग्रॅम प्रत्यक्ष वाटण्यात आले याबाबत चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखिले यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.

तालुक्यातील घोडेगाव बीट व धामणी बीट या २३० अंगणवाड्या मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पोषण आहार वाटप करण्यात आला आहे. त्यामध्ये तांदूळ, गहू ,मसूर डाळ ,चणाडाळ ,मिरची पावडर ,हळद ,मीठ ,तेल यांचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हरभरा डाळीचे व मसूर डाळीचे वाटप करत असताना पावतीवर चणाडाळ १५०० ग्रॅम व मसूरडाळ १४०० ग्राम वाटल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून सह्या घेतल्या गेल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात मसूर व चणाडाळ वाटप ७५० ग्रॅम ची पाकिटे वाटण्यात आली आहेत. बाकीच्या कडधान्याच्या पाकिटावर पुरवठा दाराचे, नाव, वजन, एक्सपायरी डेट टाकली गेली परंतु चणाडाळीच्या पाकिटावर कुठल्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी उपस्थित बालकांना उपस्थितीत पेक्षा कमी मालाचा पुरवठा केला आहे. तसेच सीडीओ पी यांनी ११/०४ /२०२० रोजी मालाचा पुरवठा केला असून दिनांक १४/०४/२०२०  रोजी माल मोजून घ्या असा एसएमएस केला. प्रत्यक्षात माल वाटप करून झाल्यानंतर हा निरोप दिला गेला असल्याचे सांगितले.

याबाबत करंजखिले म्हणाले की, या गंभीर प्रकरणांमध्ये बालकांच्या पोषण आहाराचे पुरवठादार राज्य कंजूमर फेडरेशन आणि संबंधित बालविकास अधिकारी यांचे संगनमतनुसार हा प्रकार घडला असल्यामुळे पुरवठादाराने डाळीचा निम्मा पुरवठा केला असताना देखील संपूर्ण पुरवठा केला असल्याचे दाखवून पावतीवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सही घेण्यात आली आहे. हा प्रकार गंभीर असून या प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच याप्रकरणी स्वतंत्र चौकशी नेमून पुरवठादारावर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा असे करंजखिले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

                                                                                    प्रतिनिधी-साईदीप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा