गेल्या काही वर्षात अनेक मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी दिले आपल्या पदांचे राजीनामे

पुणे, 30 जून 2022: उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमावली आहे, ते गेल्या काही वर्षांत अनेक राज्यांमध्ये दिसून आलं आहे, जिथं परिस्थिती समजून घेऊन, अनेक मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

मध्य प्रदेश

दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले तेव्हा मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. आता कमलनाथ यांचे सरकार पाडण्याची स्क्रिप्ट ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लिहिली होती ज्यांनी 22 आमदारांचा पाठिंबा घेतला होता, त्यामुळं सरकार अल्पमतात आलं आणि पुरेशा संख्येअभावी कमलनाथ यांनी फ्लोअर टेस्टपूर्वी राजीनामा दिला. येथे हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की सर्वोच्च न्यायालयानेच मध्य प्रदेशात फ्लोर टेस्ट घेण्याबाबत सांगितलं होतं.

कर्नाटक

2018 मध्ये कर्नाटकातही राजकीय खळबळ उडाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि त्यांच्या खात्यात एकूण 104 आमदार होते. मात्र पक्षाला बहुमत मिळाले नसल्यानं सरकार स्थापन करणं कठीण झालं होतं. पण त्यानंतर बीएस येडियुरप्पा यांनी 17 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता शपथ घेतल्याने बहुमत सिद्ध करणेही आवश्यक होते. अशा परिस्थितीत 19 मे रोजी फ्लोर टेस्ट घेण्यात आली. आता भाजपकडे संख्याबळ नसल्याने येडियुरप्पा यांनी भावनिक भाषण करून फ्लोअर टेस्टपूर्वी राजीनामा दिला आणि राज्यात काँग्रेस-जेडीएस युतीचं सरकार स्थापन झालं.

आंध्र प्रदेश

2016 मध्ये आंध्र प्रदेशातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील काँग्रेस सरकार वाचलं होतं. त्यानंतर नबाम तुकी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. पण त्यानंतर एका निर्णयानंतर राज्यपालांनी त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगितल्यावर त्यांनी काही तासांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला.

महाराष्ट्र

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही असेच काहीसे पाहायला मिळाले. ते केवळ काही तास मुख्यमंत्री राहू शकले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून वाद वाढला आणि शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यावेळी अखेरच्या क्षणी राजकीय समीकरण बदलत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केली आणि पहाटेच त्यांनी एकत्र सरकार स्थापन केलं. पण नंतर अजित पवारांनी वैयक्तिक कारण सांगून पाठिंबा काढून घेतला आणि महाराष्ट्रात फडणवीसांचे सरकार पडलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे