येत्या 5 वर्षात रस्त्यावरून पेट्रोलची वाहनं होतील गायब, नितीन गडकरींचा मोठा दावा

पुणे, 11 जुलै 2022: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग उभारणीचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित झाले. याशिवाय रस्ते आणि वाहनांच्या सुरक्षेबरोबरच हरित ऊर्जेच्या वापरावरही ते भर देत असतात. अलीकडेच तो हायड्रोजनवर चालणाऱ्या कारने चर्चेत आले होते. आता पुढील पाच वर्षांत पेट्रोलच्या गाड्या भारतातील रस्त्यांवरून गायब होतील, असा दावा मंत्र्यांनी केलाय. पाच वर्षांनंतर भारतात पेट्रोलची गरज भासणार नाही, असंही ते म्हणाले.

काही वर्षांत हे इंधन पेट्रोलची जागा घेईल

गडकरी म्हणाले की, हरित इंधनामुळं आगामी काळात पेट्रोलची गरज संपुष्टात येईल. त्यांनी दावा केला की, काही वर्षांनी देशातील केवळ कारच नव्हे तर स्कूटरही ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी किंवा एलएनजीवर चालतील. केंद्रीय मंत्री गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अकोला येथे एका कार्यक्रमात सहभागी होत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या भाषणात गडकरींनी हायड्रोजन, इथेनॉल आणि इतर हरित इंधनाच्या वापरावर विशेष भर दिला.

शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करा

केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘मला पूर्ण विश्वासाने सांगायचं आहे की येत्या पाच वर्षांत भारतात पेट्रोल गायब होईल. तुमच्या कार आणि स्कूटर एकतर ग्रीन हायड्रोजनवर किंवा इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी किंवा एलएनजीवर चालतील. येत्या पाच वर्षांत या क्षेत्राचा विकास दर 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवावा, असं आवाहनही गडकरींनी कृषी क्षेत्रातील अभ्यासकांना केलं. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत हुशार आहेत. त्यांना नवनवीन संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान अवगत करून त्यांचा कल बनवण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा