राज्यात काल ४,६५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर १७० कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबई, २८ ऑगस्ट २०२१: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना गेल्या तीन दिवसात करोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र आहे. दरम्यान काल हा आकडा काहीसा खाली आला आहे. राज्यात काल ४,६५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५५ हजार ४५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे.
दुसरीकडे काल राज्यात १७० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५१ हजार ५७४ सक्रिय रुग्ण आहेत. तब्बल ३६ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ५१ हजार ५७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १३,७१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण १७ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे. जळगाव (४१), नंदूरबार (२),  धुळे (१८), जालना (७५), परभणी (२३), हिंगोली (६३),   नांदेड (२९), अमरावती (९६), अकोला (२१), वाशिम (०१),  बुलढाणा (४७), यवतमाळ (०५), नागपूर (६९),  वर्धा (५), भंडारा (८), गोंदिया (२),  गडचिरोली (२९) या सतरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सरकारकडून वेगवेगळे निर्बंध उठविण्यात येत आहेत तर दुसरीकडे राजकीय यात्रा व वादाचा भडका उडाला असतानाही ऑगस्ट महिन्यात राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात २५ ऑगस्ट रोजी ५०,१८३ सक्रिय रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली असून १ ऑगस्टपासून यात मोठी घसरण झाली आहे. १ ऑगस्ट रोजी राज्यात ७८,९६२ सक्रिय रुग्ण होते. १० ऑगस्ट रोजी ही संख्या कमी होऊन ६६,१२३ एवढी झाली तर २० ऑगस्टला ५५,४५४ असलेली ही सक्रिय रुग्णसंख्या आणखी कमी होऊन २५ ऑगस्ट रोजी ५०,१८३ एवढी खाली आली. ऑगस्टमध्ये राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या घसरुन २८,७७९ एवढी कमी झाली आहे. आजघडीला देशात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे १,५९,८८७ एवढी रुग्णसंख्या आहे तर देशात ३,२२,३२७ सक्रिय रुग्ण नोंद आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा