२४ तासात राज्यातील रुग्णवाढ..

मुंबई, दि. २५ जुलै २०२०: राज्यातील कोरोना स्थिती आजुही जशीच्या तशी असून महाराष्ट्र राज्य हा कोरोना रुग्णांच्या बाबतीत देशात प्रथम स्थानी असून, राज्यातील सरकार त्यासाठी युद्ध पातळीवर काम देखील करत आहे.

राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ९६१५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले तर २७८ मृत्युचीं नोंद झाली आहे. तर राज्यात ३,५७,११७ कोरोना बाधित रुग्ण सध्या असून एकुण १३१३२ रुग्णांच्या मृत्युचीं नोंद झाली आहे तर आता पर्यंत १,९९,९६७ रुग्णांनी यशस्वी रित्या मात केली असून ते घरी परतले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक होत आसला तरी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे राज्यात सलग चौथ्या दिवशी सुद्धा ५ हजारापेक्षा जास्त रुग्णांना सोडण्यात आले. ५,७१४ रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. तर सध्या २ लाखांजवळ रुग्ण हे बरे झाले आहेत तर उपचार घेणारे रुग्णांची संख्या १,४३,७१४ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा