महाविकास आघाडीच्या विरोधात, विनायक मेटे यांच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन….!

पुणे, दि. ९ ऑगस्ट २०२०: बालगंधर्व येथे आज महाविकास आघाडीच्या विरोधात मराठा समन्वय समितीच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले आहे.

राज्य सरकार मराठा आरक्षण कोर्टात टिकावं म्हणून कोणतीही तयारी करत नाही. या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. त्यांना या समितीमधून हटवा आणि मराठा आरक्षण वाचवा अशी हाक देण्यासाठी आजचं आंदोलन सुरु असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे.राज्यातील अनेक संघटनांनी यात सहभाग घेतला होता. सध्याचे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कोणतेही पाऊले उचलत नाहीत.

मराठा समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत, त्यांना या पदावरून हटविण्याची मागणी मेटे यांनी माध्यमांशी बोलतांना केली. चव्हाण यांना “हटवा आरक्षण वाचवा” अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहेत. विनायक मेटे यांनी सांगितले की, राज्यात विविध ठिकाणी मराठा समन्वय समितीकडून जागरण गोंधळ आंदोलन केले जाणार आहे. मराठा आरक्षणाला न्याय देण्यासाठी एक चांगला कार्यक्षम मंत्री द्यावा असेही मेटे बोलले आहेत. आंदोलनामध्ये राज्यातील विविध संघटनांनी आज सहभाग घेतला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा