जखमी वारकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस

पुणे : पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावरील दिवे घाटात आज नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडून पुण्याकडे येत असताना पालखीतील वारकऱ्यांना जेसीबीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले. या सर्वांना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रुग्णलयात जाऊन जखमी झालेल्या वारकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासमवेत हवेली तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन बारवकर, अतिदक्षता विभागाचे डॉ. मिलिंद माने आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले की, प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात येत असून ही घटना घडायला नको होती. या घटनेचे मलाही दुःख झालेले आहे. हे हॉस्पिटल वैद्यकीय सुविधा सर्वांना चांगली देत आहेत असेही ते म्हणाले. यावेळी वारकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा