जितेंद्र आव्हाडांचं धीरेंद्र शास्त्री वर टीकास्र

मुंबई, १७ जुलै २०२३ : बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. तर कधी ते त्यांच्या चमत्काराच्या दाव्यांमुळे चर्चेत असतात.अलिकडच्या काही महिन्यांत त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. आता ते मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही प्रवचन देण्यासाठी जात आहेत. यावेळी नोएडामध्ये प्रवचन सांगताना त्यांच्या एका वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ वेगाने शेअर होत आहे.

त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व विधानसभा प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून या विधानाचा निषेध केला आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या या विधानावरून जितेंद्र आव्हाड ट्विटर वर ट्विट केलं की, तो धीरेंद्र शास्त्री नावाचा बाबा म्हणतो ‘स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर नसेल तर समजावं की हा प्लॉट अजून रिकामा आहे.’ असलं घृणास्पद बोलणाऱ्यांची लोक भक्ती करतात? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या असंख्य दुर्दैवी भगिनी आपल्या समाजात आहेत. धीरेंद्रच्या मते ते ‘रिकामे प्लॉट’ असावेत अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी नोएडामध्ये धीरेंद्र शास्त्री यांच प्रवचन झालं, यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी बोलताना महिलांविषयी विधान केलं. “एखाद्या महिलेच्या कपाळावर कुंकू नसेल, गळ्यात मंगळसूत्र नसेल तर आपण काय म्हणतो? हा प्लॉट रिकामा आहे. जर कुंकू असेल, गळ्यात मंगळसूत्र लटकलं असेल तर आपण लांबूनच समजून जातो की रजिस्ट्रेशन झालंय”, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत. धीरेंद्र शास्त्रींच्या या व्हिडीओ वर अनेकांनी ट्विटरवर लिहिले आहे की, असे बोलणारे ना संत असू शकतात ना कथाकार. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यावर अनेक महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा