लातूर येथे विलास बागेत विलासराव देशमुखांना अभिवादन

लातूर, दि.२६ मे २०२०: राजकारणाला समाजकारणाची नाळ जोडणारे सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करणारे लोकनेते विलासराव देशमुख यांना आज ७५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक अंतर पाळत देशमुख कुटुंबीयांनी बाभळगाव येथील विलास बागेतील स्मृतिस्थळी विनम्र अभिवादन केले.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७५ वी जयंतीदिनी बाभळगाव येथे सामुदायिक अभिवादन कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय देशमुख कुटंबियांनी घेऊन, सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्यांना अभिवादन करण्याचे आवाहन केले होते.

त्यामुळे आज (मंगळवारी) सकाळी प्रारंभी स्मृतिस्थळी फक्त देशमुख कुटूंबियानीच परस्परामध्ये सुरंक्षित अंतर ठेऊन अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने बाभळगाव येथील विलासबागेत जाऊन स्मृतीस्थळावर लोकनेत्याला विनम्र अभिवादन करून आंदराजली अर्पण केली.

यावेळी श्रीमती वैशाली विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सुवर्णा दिलीप देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, अदिती अमित देशमुख, रितेश देशमुख, जेनेलिया रितेश देशमुख, आ. धीरज देशमुख, दीपशिखा धीरज देशमुख, अविर, अवान, रियान, राहील, वंश, दिव्यांना यांनी स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा